Thursday, February 3, 2011

"धारावीचा जनताभिमुख विकास म्हाडानेच करावा

बहुचर्चित 'धारावी पुनर्विकास प्रकल्प' हा दीर्घकाल प्रतिक्षेत असलेला प्रकल्प बड्या बिल्डरान्च्या घशात जाण्याची शक्यता मावळत चालल्याने  धारावीच्या विकासाचे व पर्यायाने आपल्या सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न साकार होणार असे आशेचे किरण धारावीच्या रहिवाश्याना  दिसत आहेत. ३ के या बदनाम कलमाच्या आधारे हजारो कोटी रुपयांचा मलीदा खाजगी विकासकाना चारन्याचा उद्योग मुलाताच धारावी पुनर्विकास प्रकल्पातून सुरू झाला होता.कुंभार वाडा,कोली वाडा,महापालिका वसाहाती,छोटे उद्योजक व व्यावसायिक तसेच धार्मिक स्थलान्च्या भवितव्याबाबत प्रश्न चिन्हच उभे राहिले होते व म्हणूनच धारावीच्या जनतेचा म्हणावा तसा प्रतिसाद या प्रकल्पाला लाभला नव्हता ही वस्थुतिथी आहे. म्हाडाने हा धारावी पुनर्विकास प्रकल्प अधिक जनताभिमुख करून राबविल्यास हा रेंगाळत पडलेला प्रकल्प निश्चितच वेगाने पुढे जाईल यात शंका नाही.
सन २००० च्या पत्र झोपदेधाराकास अगदी पोतमाल्यावर रहानार्यासही  ४०० चौ. फूताचे घर,पारंपारिक उद्योग व व्यवसायिकाना योग्य पर्यायी जागा तसेच प्रकल्पामधे सर्व आवश्यक सार्वजनिक सुविधांची (शाला व महाविद्यालय,इस्पितले व दवाखाने,क्रीडांगने व उद्याने,वाचानालाये व अब्यासिका इ.) पुरेश्या प्रमाणात तरतूद, या धारावीच्या रहिवाश्यान्च्या प्रमुख मागण्या आहेत.खरे तर या मागण्यामधे गैर  असे काहीच नाही. परन्तु गडगंज नफ्याला चटावलेल्या विकासकानी व त्यांच्या रक्षणकर्त्या नोकरशहानी झारीताल्या शुक्राचार्याची भूमिका पार पाडली. दुर्दैवाने धारावीबाबत पूतना मावाशीचे प्रेम वाटनार्या नेत्यानीही या कड़े दुर्लक्ष केले. परिणामी जनतेमधे प्रकल्पाविषयी  अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले व धारावी विकासाचे घोंगडे भिजत पडले. 
बिल्डर ,नोकरशाहा व राजकारणी यांच्या युतीपासून मुम्बई वाचवायचा निर्धार केलेल्या मु.पृथ्वीराज चव्हान यानी धारावीचा विकास म्हाडा मार्फत करण्याचे सूतोवाच करून एक पाऊल पुढे टाकले आहे. बांधकाम क्षेत्रातील नामवंत कम्पन्याना बांधाकामाचे  काम सोपवून,अतिरिक्त नफ्यातून धारावी वासियांच्या रास्त मागण्या मान्य करण्याची तरतूद करता येइल.तसेच मुम्बईतील सामान्यांसाठी परवडनार्या  कीमतीची घरे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेता येइल. काही विक्रियोग्य भूखंड निविदा मागवून विकल्यास मोठ्या प्रमाणात महसूल ही  प्राप्त होईल.दुर्दैवाने पृथ्वीराज चव्हान यांचा हा 'लोकहितकारी मनसुबा हानून पाडन्यास पक्षभेद  विसरून अनेक नेत्यांनी म्हाडाच्या विरोधात एका सुरात ओरड सुरू केली आहे. या मागे 'धारावी बचाव आहे की खाजगी विकासक बचाव' हा हेतू आहे. याचा विचार धारावीवासियानी व मुख्यमंत्र्यानिही करावा.                                                                                          

1 comment:

  1. I appreciate you views on DRP. But when we are talking about development. The definition of development should be "Proper distribution of resources". Only development of land is not development. It will cause to vertical slums. And one more important factor is that, there should be shelter for the each shelter. As per the Mhada record there are 57,531 rehab units. But actual number is more that 1,00,000. Hence i feel development is highly impossible. Document should not be the criterion for the rehabilitation. First we have to develop the minds of the people then land. I felt very bad that people are very reluctant to say that they are citizens of dharavi to the outer world. Soon i m in plan to start mass movement in that regard.

    ReplyDelete