Saturday, January 29, 2011

एकाच कुटुम्बामधे अनेक सत्तास्थाने नकोत

महाराष्ट्राच्या  दौऱ्यावर आलेल्या राहूल गांधीनी राजकारनाताल्या घरानेशाहीवर कोरडे ओढले. स्वतःही केवल घराणेशाहीमुलेच राजकारणात आल्याची प्रामाणिक कबुलीही त्यानी दिली.केवल वडील व आजोबा हे सत्तेवर असल्यामुलेच मुलानी सत्ता प्राप्त करने थांबले पाहिजे असे प्रतिपादन करून अधिकाधिक तरूणानी राजकारणात यावे असे आवाहनाही त्यानी केले. महाराष्ट्रामाधे घराणेशाहीने कलस गाठला असल्याची जाणीव बहुधा राहूल गांधीना झाली असावी.
वर्षानुवर्षे सत्ता उपभोगायची,नंतर आपल्या नेतृत्वाच्या विकासासाठी पायाचे दगड झालेल्या कार्यकर्त्याना दूर सारून,आपल्या मूलाबालांसाठी सत्तेचे  दरवाजे उघडून द्यायचे,अशी अनेक उदाहरणे दिसून येतात. वडील खासदार किंवा मंत्री,मुलगा वा मुलगी आमदार किंवा जि.प. सदस्य, अशी किंवा तत्सम चित्रे अनेक कुटुम्बामधे  आढलून  येतात.यात आक्षेप घेण्यासारखे ते काय असा प्रश्न विचारण्याचे धैर्यही ही मंडली दाखवितात. डॉक्टर चा   मुलगा डॉक्टर ,वकीलाचा मुलगा वकील, होऊ शकतो तर खासदाराचा मुलगा खासदार, वा मंत्र्याचा मुलगा मंत्री का होऊ शकत नाही असा प्रश्न ही मंडली करतात.
राजकारन्यान्च्या मूलानी राजकारणात प्रवेश करण्यास कुनाचीच काही हरकत असण्याचे कारण नाही.आक्षेप आहे तो एकापेक्षा अधिक सत्तास्थाने एकाच कुटुम्बाने अडवून ठेवन्याला! लोक्शाहीमाधे अनेक कार्यकर्ते निष्ठापूर्वक पक्षाचे काम करीत असतात. अश्या अनेक सक्षम कार्यकर्त्याना त्यांच्या नव्या नव्या कल्पना प्रत्यक्षात आणून समाजसेवा करण्याची संधी मिलने आवश्यक असते. समाजाच्या सर्वच घटकाना लोकशाही प्रक्रीयेमधे सामावून घ्यावे लागते. एकाच मतदारसंघातील विविध सत्तास्थाने एकाच कुटुम्बामधे एकवटल्याने हे सारे शकय होत नाही. या वर उपाय म्हणजे,ज्या कुटुम्बामधे सत्तेचे एक पद असेल त्या कुटुम्बामधील अन्य कुणालाही सत्तेचे अन्य पद देण्यात येऊ नये. कुटुम्बातील कुणाला राजकारणात यावयाचे असेल त्याने जरूर यावे परंतू पक्ष संघटनेच्या माध्यमातून पक्षाची व जनतेची सेवा करावी. विचारांचा वारसा घेतलेली वारस मंडली अल्पावधीतच आपला ठसा उमटवू शकतील. परंतू अनेक सक्षम कार्यकर्त्याना डावलून सत्तेचा वारसा सहजपणे प्राप्त केलेल्याना कार्यकर्तेच वेळ आल्यावर अस्मान दाखवतील.
पक्षातील घरानेशाही संपवून सामान्य परंतू कर्तृत्ववान युवकाना संधी देण्याचा राहूलजीनी व्यक्त केलेला निर्धार कांग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारा ठरेल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment